Sunday 17 October 2021

समारोप

                                                             समारोप

                            नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मी क्षमाताईंच्यावर लिहिलेला लेख आला. मृदुला म्हणाली, पहिल्या दिवशी अष्टभुजेवर लेख आला.त्याक्षणी मंडळाच्या कार्यकारिणीच्या सर्व स्त्रियांवर लिहावे अशी कल्पना सुचली. मी आमच्या ग्रुप मध्ये मांडताच सर्वांनी उचलून धरली.आशानी कोणी कोणावर लिहायचे ठरवून टाकले.क्षणार्धात सर्व कोणतीही अडचण न सांगता तयार झाल्या..खरे पाहता नवरात्र असल्याने सर्वांच्याकडे काही न काही अडचणी होत्या. तरी बघता बघता दशभूजांवर लिहूनही झाले आमच्या 'पोरींची' हीच खाशियत आहे.मेळावा, सहल,स्मरणिका काही असो सर्वांच्या अंगात उत्साह संचारतो तन अनेक मन एक असे होऊन जाते आणि ही एकत्रित शक्ती कामाचे सोने करते.मृदुलानी एक बाब लक्षत आणून दिली ती म्हणजे आपण लिहिणाऱ्या सगळ्या शिक्षिका आहोत.माईक हातात आला की बोलायला सुरु आणि लेखणी हातात आली की लिहायला सुरु.आम्ही सर्व तशा फार ग्रेट काही करत आहोत असे नाही. समान वेदनेने एकत्र आलो आणि तीच वेदना असलेल्यांसमोर व्यक्त झालो..आपल्या सर्वांनी कौतुक केले भरभरून प्रतिसाद दिले.आणि या छोट्याशा कृतीला उंचीवर नेले..मला मात्र.प्रत्येकाना प्रतिसाद देता आला नाही समारोपातून सर्वाना धन्यवाद देत आहे..

                           मंडळाची स्थापना झाली तेंव्हा आपले संस्थापक शरच्चंद्र पटवर्धन म्हणाले होते हा जगन्नथाचा रथ आहे याला पुढे न्यायचे तर अनेकांचे हात लागायला हवे.आत्तपर्यंत जे काम झाले ते असे अनेकांचे हात लागल्यानेच झाले.स्मरणिकेतील माझ्या उबंटू या लेखात मी म्हटले होते,' I am because we are'. पर्किन्सन्स मित्र मंडळ या 'I' च्या बाबतही हेच म्हणता येईल.

                           सुरुवातीच्या काळात शेंडे,अनिल आणि शीला कुलकर्णी, तीर्थळी, जे.डी, राजीव ढमढेरे,दिवाणे,व्ही.बी.जोशी,प्रज्ञा जोशी अशी कार्यकारिणीती शुभार्थींची संख्या जास्त होती.श्यामाताई ,मी, करमरकर,बर्वे एवढेच शुभंकर होतो.वेगवेगळ्या कारणाने. आता फक्त शुभंकर राहिले.

                         आत्ताही स्त्रियांच असलो तरी अनेक पुरुषांचे हातभार लागत आहेतच. अतुल ठाकूर बद्दल मृदुलाने लिहिलेच आहे तो आमच्यासाठी द्र्यव्हिंग फोर्स आहे..विलास गिजरे पायलट सहलीसाठी स्वत:ची गाडी घेऊन आले.रमेश तिळवे यादी अपडेट करायचे किचकट काम करतात.whats app ग्रुप पाहतात. वाढदिवस लक्षात ठेऊन मंडळातर्फे शुभेच्छा देतात.आम्हाला त्यांचा खूप आधार वाटतो.शरच्चंद्र पटवर्धन वयामुळे त्याना काम शक्य नसले तरी कार्यक्रम पाहतात व्हाईस मेसेज करून पाठ थोपटतात.कामाचा उत्साह त्यामुळे वाढतो.करमरकर पार्किन्सन्स मित्रमंडळाचे सर्वेसर्व होते. आतापर्यंतच्या मंडळाच्या प्रगतीत त्यांचा मोठ्ठा वाट आहे.प्रकृती अस्वास्थ्यामुळे. ते काम करू शकत नाहीत. पण मी लवकर बरा होऊन ऑफिसमध्ये बसेन अशी मनीषा ठेवून आहेत आणि या कल्पनेनेच आमचे बळ वाढते.

                      ११ एप्रिलच्या मेळाव्यासाठी सुरुवातीपासून मदतीला येणारी सावरकर, हर्डीकर, पुजारी, सोनाली, मोडक,जोशी ही मंडळी आणि महत्वाचे म्हणजे दर महिन्याच्या मीटिंगसाठी फोन करणारे आमचे Phone callers  याना कसे विसरता येइल.Phone callers मध्येही रमेश तिळवे वगळता सर्व स्त्रियाच आहेत.कार्यकारिणीतील स्त्रियांबरोबर इंदू  लोहार,सरोजिनी कुर्तकोटी,जोत्स्ना पुजारी,शैलजा कुलकर्णी,विजया दीवाणे या अनेक वर्षे हे काम करत आहेत.आम्ही न मागताही अनेकजण देणग्या देतात.सगळी सोंगे आणता येतात पण पैशाचे आणता येत नाहीत हे खरेच आहे.गिरीश आणि वैशाली यांचा मासिक सभा यशस्वी करण्यात वाटा आहे गिरीश आता ऑनलाईन सभानाही मदत करतो.विनय छपाईच्या कामाबरोबर त्याची नसलेली कामेही प्रेमाने करतो.यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळे आमचे हात बळकट होतात.तरीही जितके हात वाढतील तितके हा जगन्नाथाचा रथ सहजपणे ओढता येईल. भविष्यकालीन योजना प्रत्यक्षात आणण्याचा वेग वाढेल.



                     

                 

                    

             

No comments:

Post a Comment