Sunday 12 October 2014

क्षणचित्रे

                             
                                                                                    

                        गुरुवारी ९ सप्टेंबरला आश्विनी हॉटेलमध्ये  निखील वाळकीकर आणि अर्चना राठोड याचं म मनाचा या विषयावर व्याख्यान होत ३.४५ झाले तरी आम्ही पोचलो नव्हतो प्रत्येक सिग्नलला थांबाव लागत होत पोचायला उशीर झाल्याने टेन्शन आल.जाऊन पोचलो तर खुर्च्या मांडण सुरूही झाल होत.सौ फडणीस बसलेल्या  दिसल्या मी म्हणाले .' एकट्याच आलात?'
'नाही ते काय आलेत' फडणीसांच्याकडे बोट दाखवत त्या म्हणाल्या.मला आश्चर्याचा सुखद धक्का बसला  खुर्च्या मांडणार्‍यात चक्क रमेश फडणीस होते. पोलीस ऑफिसर असलेल्या फडणीसांची तब्येत दणकट.निरोगी.पीडिला स्विकारण त्याना जड गेल तरी मित्रमंडळात यायला लागल्यापासून ते आनंदी असायचे.
                       काही महिन्यापूर्वी त्यांची मुलगी स्नेहल हिचा फोन आला होता.बाबांची तब्येत खूप बिघडली आहे.घरी येऊन फिजिओथेरपी करणारे कोणी मिळेल का विचारत होती.उत्साहाने सहलीला, सभाना येणारे फडणीस येईनासे झाले.आणि आज चक्क खुर्च्या मांडत होते चेहराही तजेलदार दिसत होता.
                     दुसरे ८३ वर्षाचे प्रभाकर पुंडे तेही ५/६  महिने प्रकृती अस्वास्थ्यामुळे आले नव्हते.आणि आज खुर्च्या मांडत होते.यापुढे कार्यक्रमात दिसणार नाहीत अस वाटणार्‍या व्यक्ती अधिक ताज्यातवान्या होऊन आलेल्या पहिल्या की खूप आनंद होतो.
                   हल्ली सभा एक आनंद सोहाळा होऊ लागल्या आहेत.सकाळीच शुभंकर वृंदा बिवलकरांचा फोन आला 'ह्यांच्या वाढदिवसानिमित्त या वेळच्या चहाचा खर्च माझा.मी वड्या केलेत. ८० वड्या पुरतील ना?  प्लॅस्टीकच्या पिशवीत पॅक केलेत द्यायला सोप्या पडतील.प्रत्येक वडीला केशराचा ठिपका ठेवलाय.थोड्या सुट्याही वर ठेवलेत कमी पडायला नकोत. तिखटही काहीतरी करणार होते.पण रेवणकर म्हणाल्या. चहा बिस्किटच देऊ.८ पुडे पुरतील ना हो.?' वृंदाताईंच्या स्वरात उत्साह आणि त्यांच्या खटाटोपाच्या प्रक्रियेतला आनंद ओसंडून वाहात होता.स्वत: पाप्याचे पितर,कॅन्सरच्या रुग्ण.मनाचा उत्साह मात्र दांडगा.सभांचे फोन करायचं कामही त्यांनी स्वत:हून मागून घेतलं.अशा अति उत्साही सदस्याना गोड शब्दात तब्येतीची आठवण करून देऊन जमिनीवर आणण आशा रेवणकराना छान जमत.
                
                 वृंदाताईंचा फोन ठेवला आणि ज्योती दळवींचा फोन आला.प्रश्नमंजुषा स्पर्धेत त्यांचा प्रथम क्रमांक आला हे त्याना कळवल होत.त्याना आणि त्यांच्या पतिना दोघानाही ताप येत असल्याने त्या येऊ शकणार नव्हत्या. त्याची त्याना हळहळ वाटत होती.बक्षिस पोष्टाने पाठवण्याचा खर्च अजिबात करू नका.मी पुढच्या वेळेस येईन तेंव्हा द्या अस त्यांनी निक्षुन सांगितलं.
                 वालकीकर आणि राठोड यांनी रोलप्लेचा आधार घेत विषय सोपा केला.
                 सं'चार' मध्ये जाहीर केलेल्या प्रश्नमंजुषेत. पद्मजा ताम्हणकर आणि ज्योती दळविना प्रथम पारितोषिक मिळाल.त्यांच्या बक्षिसाची पाकीट अंजली महाजनने छान सजवून आणली होती शिवाय अभिनंदनाच कार्डही.
                  नेहमीप्रमाणे यावेळी सदस्यांचे वाढदिवस साजरे करण्यात आले.अंजलीनी यांच्यासाठीही भेट कार्ड करून आणली होती.आणि त्यात स्वरचित कविताही होत्या त्या त्यांनी वाचून दाखवल्या.शंभरीच्या  सासूबाई आणि शुभार्थी नवरा याना सांभाळत हिला हे सगळ सुचत याच मला नेहमी कौतुक वाटत सभाना आल की अशा उत्साही लोकांची लागण इतरानाही होते.आजारामुळे आलेलं नैराश्य हळुवारपणे दूर होत.
                 सभा संपल्यावर नवा चेहरा दिसला म्हणून विचारलं तर,देणे समाजाचे प्रदर्शनात आलेल्या ज्योती देशपांडे.त्याना त्यावेळी ९ तारखेला सभा असल्याच  सांगितलं होत.ते  लक्षात ठेऊन त्या आपणहून मदतीला आलेल्या होत्या.
                अशा छोट्या छोट्या गोष्टी कामाचा उत्साह नक्कीच वाढवतात.
                 
                 

No comments:

Post a Comment