

समारोप
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मी क्षमाताईंच्यावर लिहिलेला लेख आला. मृदुला म्हणाली, पहिल्या दिवशी अष्टभुजेवर लेख आला.त्याक्षणी मंडळाच्या कार्यकारिणीच्या सर्व स्त्रियांवर लिहावे अशी कल्पना सुचली. मी आमच्या ग्रुप मध्ये मांडताच सर्वांनी उचलून धरली.आशानी कोणी कोणावर लिहायचे ठरवून टाकले.क्षणार्धात सर्व कोणतीही अडचण न सांगता तयार झाल्या..खरे पाहता नवरात्र असल्याने सर्वांच्याकडे काही न काही अडचणी होत्या. तरी बघता बघता दशभूजांवर लिहूनही झाले आमच्या 'पोरींची' हीच खाशियत आहे.मेळावा, सहल,स्मरणिका काही असो सर्वांच्या अंगात उत्साह संचारतो तन अनेक मन एक असे होऊन जाते आणि ही एकत्रित शक्ती कामाचे सोने करते.मृदुलानी एक बाब लक्षत आणून दिली ती म्हणजे आपण लिहिणाऱ्या सगळ्या शिक्षिका आहोत.माईक हातात आला की बोलायला सुरु आणि लेखणी हातात आली की लिहायला सुरु.आम्ही सर्व तशा फार ग्रेट काही करत आहोत असे नाही. समान वेदनेने एकत्र आलो आणि तीच वेदना असलेल्यांसमोर व्यक्त झालो..आपल्या सर्वांनी कौतुक केले भरभरून प्रतिसाद दिले.आणि या छोट्याशा कृतीला उंचीवर नेले..मला मात्र.प्रत्येकाना प्रतिसाद देता आला नाही समारोपातून सर्वाना धन्यवाद देत आहे..
मंडळाची स्थापना झाली तेंव्हा आपले संस्थापक शरच्चंद्र पटवर्धन म्हणाले होते हा जगन्नथाचा रथ आहे याला पुढे न्यायचे तर अनेकांचे हात लागायला हवे.आत्तपर्यंत जे काम झाले ते असे अनेकांचे हात लागल्यानेच झाले.स्मरणिकेतील माझ्या उबंटू या लेखात मी म्हटले होते,' I am because we are'. पर्किन्सन्स मित्र मंडळ या 'I' च्या बाबतही हेच म्हणता येईल.
सुरुवातीच्या काळात शेंडे,अनिल आणि शीला कुलकर्णी, तीर्थळी, जे.डी, राजीव ढमढेरे,दिवाणे,व्ही.बी.जोशी,प्रज्ञा जोशी अशी कार्यकारिणीती शुभार्थींची संख्या जास्त होती.श्यामाताई ,मी, करमरकर,बर्वे एवढेच शुभंकर होतो.वेगवेगळ्या कारणाने. आता फक्त शुभंकर राहिले.
आत्ताही स्त्रियांच असलो तरी अनेक पुरुषांचे हातभार लागत आहेतच. अतुल ठाकूर बद्दल मृदुलाने लिहिलेच आहे तो आमच्यासाठी द्र्यव्हिंग फोर्स आहे..विलास गिजरे पायलट सहलीसाठी स्वत:ची गाडी घेऊन आले.रमेश तिळवे यादी अपडेट करायचे किचकट काम करतात.whats app ग्रुप पाहतात. वाढदिवस लक्षात ठेऊन मंडळातर्फे शुभेच्छा देतात.आम्हाला त्यांचा खूप आधार वाटतो.शरच्चंद्र पटवर्धन वयामुळे त्याना काम शक्य नसले तरी कार्यक्रम पाहतात व्हाईस मेसेज करून पाठ थोपटतात.कामाचा उत्साह त्यामुळे वाढतो.करमरकर पार्किन्सन्स मित्रमंडळाचे सर्वेसर्व होते. आतापर्यंतच्या मंडळाच्या प्रगतीत त्यांचा मोठ्ठा वाट आहे.प्रकृती अस्वास्थ्यामुळे. ते काम करू शकत नाहीत. पण मी लवकर बरा होऊन ऑफिसमध्ये बसेन अशी मनीषा ठेवून आहेत आणि या कल्पनेनेच आमचे बळ वाढते.
११ एप्रिलच्या मेळाव्यासाठी सुरुवातीपासून मदतीला येणारी सावरकर, हर्डीकर, पुजारी, सोनाली, मोडक,जोशी ही मंडळी आणि महत्वाचे म्हणजे दर महिन्याच्या मीटिंगसाठी फोन करणारे आमचे Phone callers याना कसे विसरता येइल.Phone callers मध्येही रमेश तिळवे वगळता सर्व स्त्रियाच आहेत.कार्यकारिणीतील स्त्रियांबरोबर इंदू लोहार,सरोजिनी कुर्तकोटी,जोत्स्ना पुजारी,शैलजा कुलकर्णी,विजया दीवाणे या अनेक वर्षे हे काम करत आहेत.आम्ही न मागताही अनेकजण देणग्या देतात.सगळी सोंगे आणता येतात पण पैशाचे आणता येत नाहीत हे खरेच आहे.गिरीश आणि वैशाली यांचा मासिक सभा यशस्वी करण्यात वाटा आहे गिरीश आता ऑनलाईन सभानाही मदत करतो.विनय छपाईच्या कामाबरोबर त्याची नसलेली कामेही प्रेमाने करतो.यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळे आमचे हात बळकट होतात.तरीही जितके हात वाढतील तितके हा जगन्नाथाचा रथ सहजपणे ओढता येईल. भविष्यकालीन योजना प्रत्यक्षात आणण्याचा वेग वाढेल.
अंजली महाजन - पंचम आधारस्तंभ
आमची अंजली महाजन म्हणजे उत्साहाचे कारंजे.तिच्या जीवनात दु:खाचे, सत्व परीक्षा घेणारे प्रसंग आले आणि गेले. किंचित काळ अंधारले आणि पुन्हा लक्ख उजेड.तिची ही सकारात्मकता सळसळता उत्साह थक्क करणारी कल्पकता आणि उर्जा, घेऊन ती मंडळात सामील झाली.ती एका शाळेची मुख्याध्यापिका असल्याने ते काम आणि घरी अति जेष्ठ वयस्क सासू आणि पिडी असलेला नवरा हे सांभाळून ती मंडळाची कामे करत होती.
हिच्या नसानसात सामाजिक जाण भरलेली आहे. ती विद्यार्थ्यांपर्यंत तिला पोचवायची असायची मग मंडळाच्या कार्यक्रमात नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी तिने विद्यार्थ्यांना कामाला लावले.जुन्या पत्रिका साठवून त्यातून भेटकार्डे करायला तिने शिकवली.मंडळातील सर्व सभासद ही भेटकार्डे पाहून खुश झाले.संक्रांतीला तिने हलव्याचे बॉक्स करवून घेतले.त्यातून सर्वाना तिळगुळ दिला.निवृत्त झाल्यावर सर्वांच्या वाढदिवसाला ती भेटकार्डे करून आणू लागली.करोनामुळे प्रत्यक्ष सभा बंद होईपर्यंत तिचे हे काम चालू होते. इतरांना अवाक करणारे तिचे अनेक उद्योग
सातत्याने सुरू असतात.निवृत्तीनंतर ती मंडळाला अधिक वेळ देऊ लागली.
साध्यासाध्या गोष्टींचाही ती उत्सव करते वार्षिक मेळावा,सहल यावेळी तर तिच्या उत्साहाला उधाण येते.मेळाव्यासाठी मार्केटयार्डला जावून चाफ्याची फुले आणणे,केशवरावांच्याकडून कलाकृती करून घेणे,ईश्स्तवनात सहभाग घेणे या शिवाय सोपवलेले कुठलेही काम ती सक्षमपणे करतेच.पण आम्हाला कोणालाही न जमणारे एक काम ती करते ते म्हणजे वृत्तपत्राना निवेदने देणे,कार्यक्रमाची बातमी छापून आणणे.मासिकात,वर्तमानपत्रात पार्किन्सनविषयी लेख देणे,आपल्या ओळखीने आमच्याकडून लिहून घेऊन देणे इत्यादी.या साठी उन्हातान्हातून स्वत.वृत्तपत्राच्या ऑफिसमध्ये ती जायची.तेथे कोणी ना कोणी विद्यार्थी भेटायचे.नंतर मेल वरून देवू लागली. तिचे विद्यार्थी आता वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात.त्यांचा आमच्या कामासाठी ती उपयोग करून घेते.यात सहलीसाठी बस मिळवणे,बॅनर बनविणे,मेळाव्यात रांगोळी काढणे अशा गोष्टी तिच्या विद्यार्थ्यांनी केल्या.
सहल आनंदवन सारखी मोठ्ठी असो की कि लहान वार्षिक सहल असो,अंजलीशिवाय रंगत नाही.अशावेळी तिच्यातली शिक्षिका बसमध्ये हजेरी घेण्यापासून कामाला लागते आणि सहभागी ही लहान मुले बनतात सहलीचा आनंद घेतात.सगळ्याना या शिक्षिका मग गोळ्या देतात.सहलीत करमणुकीच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हा तिचा हातखंडा.बसमध्ये असो की करमणुकीच्या कार्यक्रमात गाणी लागली की तिची पावले थिरकतात.इतरही लाज सोडून हळूहळू सामील होतात.
तिचा लेख नाही अशी एकही स्मरणिका नाही.संपादन,पृफ्र रिडींग यातही ती सहभागी असते.आत्तापर्यंत तिच्यावर मी अनेकवेळा लिहिलेले आहे.तरी लिहायचे राहिले असेही खूप आहे. येथे मी मंडळाच्या कामापुरते लिहिण्याची मर्यादा घालून घेतली आहे.मंडळाच्या कोणत्याही कामासाठी,केंव्हाही हाक मारा ती हजर राहणारच असा आम्हा सर्वाना तिच्याबद्दल विश्वास वाटतो.असा हा मंद्लातले वातावरण आनंददायी ठेवणारा भक्कम स्तंभ.
पर्किन्सन्स मित्रमंडळाची स्त्रीशक्ती
पार्किन्सन्स मित्रमंडळाचा सर्व कारभार सध्या स्त्रीयांच्याकडे आहे.११ एप्रिल जागतिक पार्किन्सन्स दिनाच्या मेळाव्यातील एका फोटोत आम्ही सर्व एका रांगेत होतो.शुभार्थी अविनाश धर्माधिकारी यांनी खाली लिहिले पार्किन्सन्स मित्रमंडळाची स्त्री शक्ती.त्यावेळी आपल्यातल्या सुप्त शक्तीची प्रथम जाणीव झाली.कितीही समस्या येवोत मंडळाचे कार्य पुढे न्यायचे हे नकळत आमच्या सर्वांच्या मनात पक्के झाले.मंडळाचा पाया मधुसुद शेंडे,शरच्चंद्र पटवर्धन यांनी रोवला. रामचंद्र करमरकर,जे.डी.कुलकर्णी, अनिल कुलकर्णी,शेखर बर्वे, चंद्रकांत दिवाणे, राजीव ढमढेरे, व्ही.बी.जोशी अशी पुरुष मंडळी कार्यकारिणीत होती.करमरकर ,बर्वे,जोशी वगळता एकेक पान गळाले., बर्वे, जोशी वय, प्रकृती या कारणाने प्रत्यक्ष कार्यकारिणीतून बाजूला झाले.करमरकर तब्येतीमुळे कार्यरत नसले तरी मी बरा होणार आणि रोज काही वेळ ऑफिसमध्ये बसणार असे स्वप्न बाळगून आहेत.ते बरोबर आहेत.ही भावनाच आम्हाला बळ देते. औरंगाबादहून रमेश तिळवे यांचाही आधार आहे.
आता नवीन जागेत मंडळाचे ऑफिस हलले.अंजली म्हणाली आपण स्त्र्शक्तिनी मिळून नवरात्रात ऑफिसचे उद्घाटन करू.आम्ही सर्व सामान्य स्त्रिया आहोत.पार्किन्सन्सने आम्हाला एकत्र आणले.अंगावर पडलेली,शुभार्थीची जबाबदारी असो किंवा मंडळाची आम्ही आपली शक्ती पणाला लावायचा प्रयत्न करत आहोत.झपाटल्यासारखे काम करत आहोत.आमच्या धुरिणांनी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्याचा वसा घेतला आहे.'की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने' म्हणत प्रकाशाकडे वाटचाल करत आहोत.दसऱ्याला सीमोल्लंघन करून मंडळाला नव्या पर्वत नेऊ.आपल्या सर्वांची साथ, शुभेच्छा बरोबर आहेतच.
नवरात्रात आमच्यातील दशभुजांच्या मंडळातील कामाशी संबंधित कार्याची ओळख करून देत आहे.हे करताना आत्मप्रौढी अजिबात नाही तर आमच्यापर्यंत पोचलेले स्फुल्लिंग मंडळातील सर्व स्त्रीशक्तीपर्यंत पोचवण्याचे काडीचे माध्यम आहोत ही भावना आहे.स्त्रियांनी आपल्यातील शक्ती जागवून मंडळाच्या कार्यात सामील होऊन ही शक्ती सहस्त्रभुजा करावी ही मनीषा आहे.
१. आमच्या आधारस्तंभ श्यामलाताई शेंडे
श्यामलाताई मंडळाच्या ट्रस्टच्या अध्यक्ष आहेत.जेंव्हा ट्रस्ट झाला
तेंव्हा अध्यक्ष म्हणून सर्वानुमते पहिले नाव पुढे आले ते
श्यामलाताईंचे.त्या नेहमी म्हणतात मी नामधारी आहे.पण आम्हाला कोणालाच हे
मान्य नाही.मंडळाची स्थापना २००० साली झाली तेंव्हापासून त्या मंडळात
घडलेल्या प्रत्येक घटनेच्या साक्षीदार आहेत.२००७ मध्ये आम्ही सामील
झाल्यापासून शेंडे साहेबांच्या स्वप्नांचे त्या हात बनल्या आहेत हे
जाणवले.प्रथमदर्शनीच कोणावरही प्रभाव पाडणारे असे त्यांचे व्यक्तिमत्व
आहे.शेंडे साहेबांसारख्या थोड्या हट्टी,महत्वाकांक्षी, काळाच्या पुढची
स्वप्ने पाहणाऱ्या आणि ती सत्यात उतरवण्यासाठी वाढलेल्या पार्किन्सन्सची
पर्वा न करणाऱ्या साथीदाराची सहचारिणी होणे सोपी गोष्ट नव्हती.पण त्यांनी
ते काम चोखपणे पार पडले आणि आताही तितक्याच निष्ठेने काम करत आहेत.स्वप्ने
पाहताना त्यांना वास्तवाचेही भान असते.परखडपणे त्या आपले मत मांडतात.ते
पटणारेही असते.
त्या काही काळ अमेरिकेत तर काही दिवस भारतात असतात.पण घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी असे त्यांचे असते.ऑनलाइन सभा सुरु झाल्यापासून त्या भारतात असो की अमेरिकेत असो हजर राहतात. आमच्या कार्यकारिणीच्या सभाही ऑनलाइन होतात.त्यांचा सभेत सहभाग असल्यावर निश्चिंतता असते.आमची कामाची घाई चाललेली असली की आपण भारतात नाही याची त्यांना हळहळ वाटत असते. पण तेथे राहूनही त्यांनी कामाची जबाबदारी उचललेली असते.यावर्षीच्या स्मरणिकेतील चारुलता सांखला यांच्या व्याख्यानावरील लेख सर्वाना उपयुक्त ठरला आहे श्यामला ताईंनी व्याख्यानाच व्हिडीओ ऐकून अमेरिकेत बसून हे किचकट काम केले.जागतिक पार्किन्सन्स दिन मेळाव्यातील भाषणाच्या आत्तापर्यंतच्या व्हिडिओचे शब्दांकन त्या करत आहेत..स्मरणिकेच्या प्रूफ रिडींगच्या कामाठी त्यांनी तेथे राहून मदत केली.
मेळाव्यासाठी हॉल घेतला त्याचे भाडे शेंडे साहेब असल्यापासून ते द्यायचे.ते आजतागायत सुरु आहे.या पतीपत्नीचा लोकसंग्रह मोठ्ठा आहे.श्यामलाताईंची अमेरिकास्थित मैत्रीण सुधा कुलकर्णी या गेली अनेक वर्षे भारतात आल्या की मित्रमंडळाच्या सभेला येतात.आणि दरवर्षी स्वत:च्या वाढदिवसाला २५००० रुपये देणगी देतात.शेंडे पतीपत्नीची कामाची तळमळ आणि त्याच्याबद्दल असलेल्या विश्वासामुळेच ही लक्ष्मी मंडळाकडे येते.त्यांच्या विश्वासावर देणगी देणारे अनेक आहेत.कै.डॉ.विजय देव,डॉ.वीणा देव, डॉ. अमित करकरे ही मंडळी त्यांच्या शब्दाखातर मदतीला हजर राहणारी.वीणाती आजारी होत्या तरी श्यामलाताईच्या शब्दाखातर अभिवाचनासाठी आल्या.
अमेरिकन सपोर्ट ग्रुपकडून पीडीच्या क्षेत्रातील नेत्रदीपक कामगीरी बद्दल शेंडे पतीपत्नीना प्रशस्तीपत्र मिळाले.त्यांच्या असण्यामुळे मंडळाच्या कार्याची नौका वादळ वार्यातही सुखरूप राहिली.आणि राहील.असाआम्हाला विश्वास आहे.
श्यामलाताई मंडळाच्या ट्रस्टच्या अध्यक्ष आहेत.जेंव्हा ट्रस्ट झाला
तेंव्हा अध्यक्ष म्हणून सर्वानुमते पहिले नाव पुढे आले ते
श्यामलाताईंचे.त्या नेहमी म्हणतात मी नामधारी आहे.पण आम्हाला कोणालाच हे
मान्य नाही.मंडळाची स्थापना २००० साली झाली तेंव्हापासून त्या मंडळात
घडलेल्या प्रत्येक घटनेच्या साक्षीदार आहेत.२००७ मध्ये आम्ही सामील
झाल्यापासून शेंडे साहेबांच्या स्वप्नांचे त्या हात बनल्या आहेत हे
जाणवले.प्रथमदर्शनीच कोणावरही प्रभाव पाडणारे असे त्यांचे व्यक्तिमत्व
आहे.शेंडे साहेबांसारख्या थोड्या हट्टी,महत्वाकांक्षी, काळाच्या पुढची
स्वप्ने पाहणाऱ्या आणि ती सत्यात उतरवण्यासाठी वाढलेल्या पार्किन्सन्सची
पर्वा न करणाऱ्या साथीदाराची सहचारिणी होणे सोपी गोष्ट नव्हती.पण त्यांनी
ते काम चोखपणे पार पडले आणि आताही तितक्याच निष्ठेने काम करत आहेत.स्वप्ने
पाहताना त्यांना वास्तवाचेही भान असते.परखडपणे त्या आपले मत मांडतात.ते
पटणारेही असते.
त्या काही काळ अमेरिकेत तर काही दिवस भारतात असतात.पण घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी असे त्यांचे असते.ऑनलाइन सभा सुरु झाल्यापासून त्या भारतात असो की अमेरिकेत असो हजर राहतात. आमच्या कार्यकारिणीच्या सभाही ऑनलाइन होतात.त्यांचा सभेत सहभाग असल्यावर निश्चिंतता असते.आमची कामाची घाई चाललेली असली की आपण भारतात नाही याची त्यांना हळहळ वाटत असते. पण तेथे राहूनही त्यांनी कामाची जबाबदारी उचललेली असते.यावर्षीच्या स्मरणिकेतील चारुलता सांखला यांच्या व्याख्यानावरील लेख सर्वाना उपयुक्त ठरला आहे श्यामला ताईंनी व्याख्यानाच व्हिडीओ ऐकून अमेरिकेत बसून हे किचकट काम केले.जागतिक पार्किन्सन्स दिन मेळाव्यातील भाषणाच्या आत्तापर्यंतच्या व्हिडिओचे शब्दांकन त्या करत आहेत..स्मरणिकेच्या प्रूफ रिडींगच्या कामाठी त्यांनी तेथे राहून मदत केली.
मेळाव्यासाठी हॉल घेतला त्याचे भाडे शेंडे साहेब असल्यापासून ते द्यायचे.ते आजतागायत सुरु आहे.या पतीपत्नीचा लोकसंग्रह मोठ्ठा आहे.श्यामलाताईंची अमेरिकास्थित मैत्रीण सुधा कुलकर्णी या गेली अनेक वर्षे भारतात आल्या की मित्रमंडळाच्या सभेला येतात.आणि दरवर्षी स्वत:च्या वाढदिवसाला २५००० रुपये देणगी देतात.शेंडे पतीपत्नीची कामाची तळमळ आणि त्याच्याबद्दल असलेल्या विश्वासामुळेच ही लक्ष्मी मंडळाकडे येते.त्यांच्या विश्वासावर देणगी देणारे अनेक आहेत.कै.डॉ.विजय देव,डॉ.वीणा देव, डॉ. अमित करकरे ही मंडळी त्यांच्या शब्दाखातर मदतीला हजर राहणारी.वीणाती आजारी होत्या तरी श्यामलाताईच्या शब्दाखातर अभिवाचनासाठी आल्या.
अमेरिकन सपोर्ट ग्रुपकडून पीडीच्या क्षेत्रातील नेत्रदीपक कामगीरी बद्दल शेंडे पतीपात्नीना प्रशस्तीपत्र मिळाले.त्यांच्या असण्यामुळे मंडळाच्या कार्याची नौका वादळ वार्यातही सुखरूप राहिली.आणि राहील.असाआम्हाला विश्वास आहे.